bank of maharashtra

लाल किल्ल्याच्या सुरक्षेत मोठी चूक; ५ बांगलादेशींना अटक

0

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी लाल किल्ल्याच्या परिसरात जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच बांगलादेशींना अटक केली आहे. हे सर्व बांगलादेशी बेकायदेशीर स्थलांतरित असल्याचे सांगण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसारहे पाच बांगलादेशी सोमवार ४ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्याच्या परिसरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांना संशय आला आणि त्यांना सर्वांना ताब्यात घेण्यात आले.

पोलीस चौकशीत हे पाचही बांगलादेशचे रहिवासी असल्याचे उघड झाले आहे. आणि ते बेकायदेशीर स्थलांतरित आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सर्वांचे वय सुमारे २० ते २५ आहे जे दिल्लीत मजूर म्हणून काम करतात. पोलिसांनी त्यांच्याकडून बांगलादेशची काही कागदपत्रे जप्त केली आहेत. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे आणि ते लाल किल्ल्याच्या परिसरात का प्रवेश करत होते आणि त्यांचा उद्देश काय होता हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

बांगलादेशी नागरिकांच्या घुसखोरीच्या या प्रकरणाबरोबरच लाल किल्ल्याच्या सुरक्षेतील त्रुटीचे एक मोठे प्रकरण समोर आले आहे. ज्यामध्ये अनेक पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याबद्दल या सर्वांना निलंबित करण्यात आले आहे.१५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यात दररोज वेगवेगळे सुरक्षा कवायती घेतल्या जातात. ज्यामध्ये सुरक्षा व्यवस्था किती मजबूत आहे हे पाहिले जाते. यादरम्यान जेव्हा स्पेशल सेलची टीम नागरी पोशाखात पोहोचली.त्यांच्या बॅगेत एक डमी बॉम्ब ठेवला आणि आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना त्यात यश आले. लाल किल्ल्याच्या सुरक्षेतील ही एक मोठी चूक होती.म्हणूनच यासाठी जबाबदार असलेल्या ७ पोलिसांना तात्काळ निलंबित करण्यात आले.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech